पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने

'दशक्रिया' चित्रपटाच्या निमित्ताने  त्या विधी आणि कर्मकांडांना छद्म वैज्ञानिक संदर्भ देऊन खऱ्याखोट्याची सरमिसळ करून लोकांना भ्रमित करणाऱ्या पोस्टचे केलेले हे मुद्देसूद खंडन -- जेट जगदीश. (^j^) >>> मृत्यू हा माणसाला नेहमी भयप्रद आणि मयताच्या नातेवाईकांना दुःखदायक आणि सैरभैर करणारा असतो. अश्या शोकाकुल लोकांकडून मृतदेहाची नीट विल्हेवाट लावली जाणे शक्य नसते. त्यासाठी एक तरी माणूस असा लागतो जो तुमच्या भावभावनांशी निगडित नाहीये, ज्याने मृत्यू आणि त्या भोवतालचा कल्लोळ अनेक वेळा बघितला आहे म्हणूनच तो त्रयस्थपणे हे काम करू शकतो. तो एक माणूस म्हणजे क्रिया कर्म आणि दशक्रिया विधी करून घेणारा ब्राह्मण. *खंडन : भावनांवर काबू ठेवून मृत्यू जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे समजून घेतले तर जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख जरी झाले तरी वास्तवाचा स्वीकार केल्याने दुःख हलके होते. मग यांत्रिक पद्धतीने विधी करणाऱ्या रोबो ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही हे कळते. आणि कुठलेही विधी न करता प्रेताला अग्नीच्या स्वाधीन करून त्याची योग्य विल्हेवाट लावता येते.* >>> अग्निसंस्कार करताना केलेल्या प्रत

स्त्रियांच्या दागिन्यांचे छडमविज्ञान

*”आपली संस्कृती"* *"विपर्यास आणि सत्य”* *❌असत्य:* बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का *✔सत्य:* *मग पुरुषांना बसू नये थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का,* *म्हणून त्यांना मंगळसूत्र, बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का.* *❌असत्य:* मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब, तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !! *✔सत्य:* *कंबरपट्यांमुळे नाही वाचत तुमच्या पाठीचा खांब,* *डॉक्टरने दिलेले पट्टा वापर, आजार होईल बरा, सांगतोय ठाम.* *❌असत्य:* सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा *✔सत्य:* *सौंदर्य म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा,* *दुरान्वयेनी ही संबंध नाही सायनस आजाराचा.* *❌असत्य:* कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल, उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल. *✔सत्य:* *पैंजणामुळे उष्णतेचा दाह होतो कमी, अशी देवू नका हूल,* *थंडीत पैंजणाचे काय करणार, अशी करू नका भूल.* *❌असत्य:* बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या

कुंकवाच्या अफवा

कुंकवाच्या अफवा... (^m^) (^j^) (मनोगते) 'महिलांनी कुंकू का लावावे ?' या फेसबुक आणि व्हॉटस्अँपवर धर्मअंध हिंदुत्ववाद्यांकडून पसरवण्यात येत असलेल्या पोस्ट्स बद्दल... सर्व प्रथम हे लक्षात घ्यायला हवे की त्यांनी ही फेक स्टोरी बनवली आहे. कारण चारही वेदांमधे व उपनिषदात कुठेही स्त्रियांनी कुंकू लावावे असा उल्लेख सापडत नाही. त्यांच्या अनेक शतकानंतर लिहिले गेलेल्या रामायण या ग्रंथात देखील दशरथ गेल्यानंतर त्यांच्या 3 ही पत्नीनी कुंकू पुसले असे लिहिल्याचा कुठेही उल्लेख रामयणाच्या जुन्यातल्या जुन्या प्रतीत आढळत नाही. तसेच त्यावेळच्या उत्तर भारतातील आर्य संस्कृतीत कुठेही कुंकू अस्तित्वात नव्हते. हिंदू धर्मात कर्मकांड वाढीला लागल्यानंतर स्त्रियांना दुय्यम स्थानावर टाकण्यासाठी त्याकाळच्या पुरोहितांकडून कुंकू या सौभाग्य लेण्यांवर भर देण्यात आला. त्यासाठी छद्म विज्ञानाचा आधार घेऊन पिट्यूटरी ग्लैंड, एक्यूप्रेशर ही माहिती देखील भारतीयांना होती असे भासवण्यात आले. पण असा उल्लेख आयुर्वेदशी सम्बंधित चरक, सुश्रुत वग़ैरे कुठल्या ही ग्रंथात नाहिये. एक्यूप्रेशर ही चीनी वैद्यकीय विद्या आहे जी त्याका

वटपौर्णिमा

आणखी एक खोटे विज्ञान. आधी मूळ पोस्ट वाचा. वटपौर्णिमा !!! काय आहे *७* जन्माचे रहस्य?  *७* जन्म हाच पती मिळवा यावरून खूप विनोद होत आहेत. पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत. मुळात या *७* जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत. मग काय आहे *७* जन्म? ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे. शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते. काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते. या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो *१२* वर्षे. म्हणून तप करायचे *१२* वर्षे. *१२* वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्म. असे सात जन्म म्हणजे *१२×७=८४.* पूर्वी लग्न होत *१६* व्या वर्षी. त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती _*१६+८४=१००*_ वर्षे जगो !!! पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म. पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही. ~~~~~~~~~~ या पोस्टला उत्तर: वरील पो

राजापूरची गंगा आणि सत्य

राजापूरची गंगा दर तीन वर्षांनी अवतरते व साधारणतः दोन महीने राहते असे म्हटले जाते. तिचे दर तीन वर्षांनी अवतरणे व सुमारे दोन महीने राहणे ही एक मान्यता आहे. तसेच ती येते कुठून ही दुसरी बाब आहे. यातील दुसर्‍या बाबी बाबत भूगर्भशास्त्रज्ञ असे म्हणतात की हा भूगर्भीय वक्र नलिकेचा (siphon) प्रकार असावा. भूगर्भातील हालचाली सुद्धा या गंगेचे वेळी अवेळी येण्यास कारण असाव्यात. कुठल्याही एकाद्या झर्‍या सारखाच, थोडी वेगळी पार्श्वभूमी असलेला हा एक झरा आहे.  पावसाळ्यात दिसणारे धबधबे पाऊस (म्हणजे पाण्याचा स्त्रोत) संपताच गायब होतात. त्याच प्रमाणे शुद्ध तर्क शास्त्र वापरल्यास राजापूरच्या गंगेच्या पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होताच ती अवतरते व संपला की आटते, असे म्हणता येईल. *आपण भारतीय धबधब्याला, अन्य झर्‍यांना चमत्कार मानत नाही पण या गंगेला मात्र मानतो.* या गंगेला चमत्कार मानण्याचे दुसरे कारण असावे की दर तीन वर्षांनी प्रकट होते. तसेच भर पावसाळ्यात तिची कुंडे कोरडी असतात असाही एक समज आहे. परंतु उपलब्ध माहितीच्या आधारे दिसून येते की ही वस्तुस्थिती नाही. इंटरनेट वर शोधलेल्या विविध साइट्स व वर्तमान पत्रातील

शिवथरघळ

*आम्हाला आलेला मेसेज आणि 'चला उत्तर देऊ या' ग्रुपने दिलेले उत्तर...* *मुळ मेसेज 👇🏽* *शिवथरघळ :* वाचावाच असा एक अद्भूत वैज्ञानिक चमत्कार!!! एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. रहायला नेहेमी मिळते तशी मोफ़त खोली मिळाली...आज फ़ारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजुन कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून रहावयास पाठविले. एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले! "हाय! मी भोपळे!" ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता...इतक्यात त्यांनी पॅंटच्या खचाखच भरलेल्या खिशांतून काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली...माझी उत्कंठा ताणली गेली.."हे काय आहे?" "ही जीपीएस मशीन्स आहेत,,,डू यू नो व्हॉट जीपीएस इज?" माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला! "येस, आय नो...पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता?" हसत हसत ते म्हणाले,"मी जीपीएस वेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे " असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहे-यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले," हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आत

सोमनाथ मंदिर

*सोमनाथ मंदिर ते उत्तर ध्रुव या सरळ रेषेत एकही भूभाग येत नाही व म्हणून आपले पूर्वज किती ज्ञानी होते अशा अर्थाची पोस्ट फिरते आहे त्यास हे उत्तर.* हिंदुत्वाचा उदो उदो करतांना व आपले जुने ते सर्व काही विज्ञानच आहे हे सिद्ध करण्यासाठी खोटेपणाचा किती आधार घेतला जातो व आपल्याच धर्मबांधवांना किती मूर्ख समजले जाते याची हे पोस्ट म्हणजे ढळढळीत उदाहरण आहे. अशी पोस्ट लिहिणारे तथाकथित हिंदुत्ववादी जर हिंदुत्वाची धुरा खांद्यावर वाहत असतील तर हिंदू धर्माची वाट लावायला ते स्वतःच समर्थ आहेत. कुठल्या शत्रूची गरज नाही. आता हे कसे ते पाहू या. *1) सोमनाथ मंदिर हे हिंदूंचे पवित्र, पूज्य स्थळ आहे व ज्योतिर्लिंग आहे या बद्दल दुमत नसावे. हा श्रद्धेचा विषय आहे.* *2) सोमनाथ मंदिर किती वेळा लुटले गेले तरी ते दर वेळी तश्याच वैभवाने उभे राहत होते अशी सुरुवात या पोस्ट मध्ये केली आहे. याचा लेखकाला अभिमान वाटतोय काय? प्रत्येक वेळेस हे वैभव मंदिरात कुठून येत होते? हे वैभव तिथे आहे हे शत्रूला कसे कळत होते? ते लुटतांना देवाच्या कोपाने शत्रूचे हात पाय झडून का नाही गेले? इथले शासनकर्ते ही लूट होतांना झोपा काढत होत

गोहत्या: न्यायालायचीही दिशाभूल

सनातनी दिशाभूल करण्यात किती पटाईत आहेत ते हा लेख आणि त्याला दिलेले उत्तर वाचल्यावर लक्षात येईल. मूळ लेख असा आहे. गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) "गोहत्या बंदी" हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर) आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा
चित्रपटाच्या निमित्ताने सुद्धा जातीय मानसिकतेचेच प्रदर्शन. आर्चीला तिच्या वडिलांनी लिहिलेले एक पत्र आणि त्याला दिलेले उत्तर प्रिय आर्ची... बाळा मी बोलतोय... तुझा तात्या.... माझ्या बाळा, तु जरी चिरडुन गेली आमचं आयुष्य तरी.. प्रिन्सनं तुमच्या सोबत जे केल ते लय वाईट... बाळा, त्याला काय माहीत माझ्या या काळजाच्या तुकड्याला मी किती जपलं होतं... तु तुझ्या आईला म्हनाली होती ना ! डोळ्यात पाणी आणुन ! तात्या बोलतील का....? हो मीच बोलतोय...!! बाळा मला विचारायचंय तुला काय कमी पडलो आम्ही तुला वाढविण्यात...? बाळा जातीपातीच्या चिखलातला मी नाही....! प्रत्येक हौस मौज हात जोडुन उभी होती तुझ्या समोर . आधुनिक जगातल्या आधुनिक जिवन शैलीत तुला वाढविले! तुला बुलेट, ट्रॅक्टर, कार सर्व चालवायला शिकविले! प्रिंन्स व तुझ्यात काही भेदभाव केला नाही... अशा वेळी मी काहीच न कमवणाऱ्या पोरा सोबत लग्न कसं मान्य करु..? कोणता गुण होता परशात म्हणून मी तुझा हात त्याच्या हातात द्यायचा होता..? किशोर वयात मन हळवं व शरीराची भुक तिव्र असते हे मान्य आहे मला..! पण तेवढ्या एकाच कामासाठी ज

अध्यात्म आणि सायन्स

चला, आज पुन्हा एकदा एका खोटारड्या पोस्टचा समाचार घेऊया. आधी ती पोस्ट वाचा आणि मग तिचे विश्लेषण वाचा. सुरुवातीला मूळची पोस्ट. अवश्य वाचा.... . अध्यात्म आणि सायन्स !! श्री !! देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई. आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू. 1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........ ह्यामागे

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य

सध्या *'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'* या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. 1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो. 2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत अ

दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?....

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना लक्ष्य करणारी एक दिशाभूल करणारी कविता आणि तिला दिलेले उत्तर पहिल्यांदा ती संबंधित कविता वाचा. दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?.... देवाला फूल चढ़वल जात तेव्हा तुम्ही रागवता! मग मेणबत्ती पेटवतेवेळी, चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का? दाभोळकर...... माझा गणपती घरी येतो तेव्हा तुम्ही टिका करता! त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा, त्याचा मसीहा येतो त्यावेळी तुम्ही गप्प का? दाभोळकर... माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत! त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी त्यांची सुंता होते त्यावेळी तुम्ही गप्प का?  दाभोळकर....... आमचे व्रत उपवास सण तुम्हाला नकोसे होतात! पण त्यांचा रोजाच्या वेळी, यांचा गुडफ्रायडे वेळी तुम्ही गप्प का?  दाभोळकर....... माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही त्यांच मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक ख्रिस्ती शाळेत येशु मूर्ती रूपान हज़र, त्यावेळी तुम्ही गप्प का?  दाभोळकर...... स्री शिक्षणातली हिंदू सावित्री कधी तुम्ही समजूनच घेतली नाही... कारण मुस्लिम बुरख्यातुन तुम्हाला पाश्चमात्य नग्नता चांगली वाटली..... आमचा