पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तांब्या पितळेच्या भांड्यांनी पाणी स्वच्छ होते?

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ? Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33 सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ? ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख. २००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल देता येणे शक्य नव्हते. हा मुद्दा होता, जर गावातील पाणी अश्या प्रकारे दुषीत अ सेल तर ही जनता हेच पाणी वापरून तग तरी कशी धरून आहे? जर ह्या पाण्या बद्दल जनतेला माहीती असती तर जनेतेने ते पाणी शुद्ध करण्यासाठी एका तरी treatment चा पर्याय निवडला असता. ह्या पर्यायत पाणी उकळवणे, पाणी शूद्धी करणासाथी ULTRA Violet उपकरणाचां वापर करणे. पण ही ठरली जनता ज्यांची एका वेळेची जेवायची मारामार तेथे पाणी शूद्धीकरण

RSS का विभाजित झाली नाही?

100 वर्षापेक्षा जास्त वर्षे होऊन ही RSS कधी गटात विभाजित झाली नाही ध्येयवादी माणसे म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो .चुकीचे ते आपल्यासाठी आहेत , पण ते त्यांच्यासाठी योग्य आहेत . ते त्यांची व्यवस्था टिकवण्यासाठी घेत असलेली मेहनत कौतुकास्पदच  आहे . हो उलट आमच्याकडे घ्या, पटत नाही किंवा वैचारिक वाद झाले की दुसरी संघटना काढली जाते. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात . आमच्याकडे ध्येय नाही. आमच्याकडे प्रसिद्धी साठी काम केली जातात .मला मोठा म्हणा  म्हणून काम केली जातात . rss चा पुढील नेता कोण हे माहिती नसते पण आमच्याकडे पटले नाही की  विभाजित होऊन स्वतः नेता म्हणून  जाहीर केले जाते . ही परिस्थिती आहे  आपली. आपण rss वर टीका जरुर करतो पण काम करण्याचे तंत्र काही शिकत नाही . याला आपण दोषी ठरतो हे ही वास्तव आम्ही समजले पाहिजे . Rss सारखी आमची काम करण्याची पद्धत नाही . त्यांच्यातला तो संयम , त्यांच्यातील ती जिद्दही आमच्यात नाही , हे प्रामाणिकपणे आम्ही कबूल केले पाहिजे . आजची परिस्थिती काय?  rss  ने सत्तेत येण्यासाठी अनेक रचनाबद्ध काम केलेली आहेत. त्यातला एक अंश ही काम आमच्याकडे झालेले नाही. rss

राम राम का म्हणावे ?

*राम राम का म्हणावे?*  मराठी संस्कृती मध्ये *राम राम*  बोलण्या मागे काय कारण असावे अस सर्वांनाच वाटत असेल. पूर्वी पासून आपले वडील, काका, बाबा,मित्रपरिवार जेव्हा पण एकमेकासमोर आले की,  *राम राम* ह्या पवित्र प्रेमाने शब्द् बोलन्या मागचे कारण काय असावे आणि महत्वाचे म्हणजे या शब्दाचा उच्चार दोन वेळाच का केला जातो, कारण अस असावे की मराठी मुळाक्षरामध्ये *”र"* २७ वे अक्षर आहे. *”आ”* हे २ रे अक्षर आहे आणि *”म"* हे २५ वे अक्षर आहे. *२७+२+२५=५४* योगांचा शब्द तयार होतो म्हणजेच एक वेळा *”राम"* म्हणल्याने ५४ योग् तयार होतात तर दोन वेळा *”राम"* म्हणल्याने *१०८* योग तयार होतात........ म्हणजेच आपण एक माळ जाप केल्याचे पुण्य आपणास मिळते. चला तर मग आपण पण ही परंपरा अशीच चालू ठेऊयात, आणि  राम नामाचा जप चालू करुया.  ॥जय श्री राम ॥ 🚩 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ” हिंदुंनी 'राम, राम' का म्हणावे❓ या हास्यास्पद पोस्टला *उत्तम जोगदंड* याचे उत्तर... ‘राम’ हे हिंदूंचे दैवत असले व अशा हिंदूंचा श्रद्धेचा अधिकार मान्य केला तरी, बादरायण संबंध या वाक्प्रचारास अगदी चपखलपणे लागू होईल अशा या तर्कहीन
' मंदिर की ग्रंथालय '  ते ' मंदिर आणि ग्रंथालय'  ! गेल्या एक दोन दिवसांत अनेकांना ' मंदिर नको ग्रंथालय  आणि हॉस्पिटल हवी   ' अशी वैचारीक उबळ येत असल्याने हा लेखनप्रपंच !!  मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे .. काही लोक तर्कावर जगतात आणि काही लोकांना  जीवन व्यतित करण्यासाठीं श्रद्धेची  गरज वाटतें .. ज्यांना श्रद्धा गरजेची वाटते त्यांच्या श्रद्धेला कमी लेखण्याची गरज  कोणाला का भासावी ?विशेषतः जिथे तर्क  मागितला तर तर्कसुद्धा दिला जात नाही किंवा ज्यांना देता येत नाही  आणि इतरांच्या श्रद्धेचा उपहास करून केवळ बालहट्ट म्हणून '  मंदिर नकोच  ' ही मागणी केली जाते अशा ठिकाणी हा प्रश्न अधिक उचित आहे ज्याप्रमाणे  बागा , खेळांची मैदानं , ग्रंथालयं , किल्ले , amusement parks , trekks , कलामंदिर , नाट्यगृह , सिनेमागृह   ही माणसाच्या जडणघडणीचा एक भाग असतात त्याचप्रमाणे श्रद्धास्थान म्हणून मंदिरंसुद्धा त्या जडणघडणीचा एक भाग असतात ..माणूस केवळ पैशावर आणि  ज्ञानावर जगू शकत नाही ..भावना, श्रद्धा , भक्ती , प्रेम , सहजीवन ह्या आणि अशा अनेक  अमूर्त  (intangible) गरजा माणसाला ज

औक्षण, ऑरा, तेजोवलाय वगैरे

🍁🍁  तेजोमय तेजोवलाय(ऑरा) वाढविणारे                     औक्षण -ओवाळणे Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another. असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो न्यूटन चा नियम , माहीती आहे ” पण – ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे.पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते. असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो माहीती आहे - एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे , I don’t believe this ” अहो , न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं. देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय ? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते ! सत् - चित्-आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही  ! परमात्मा म्हणा वा एनर्जी – दोन्ही एकच “ अनादीअनंत ” “ माझा देवावर विश्वास नाही  ” हे आताशा चालतं. पण " माझा उर्जेवर विश्वास नाही " असे एखाद्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत म्हणून पहा.हकालपट्टीच होईल खास

कोकणातील गावपळण

कोकणातील गावपळण ही प्रथा. अख्ख्या गावाने गावाच्या वेशीबाहेर उघड्या माळावर जाऊन राहण्याची ही प्रथा कधी आणि कशासाठी निर्माण झाली, हे समजून न घेताच तिच्यावर अंधश्रद्धा म्हणून ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’पासून ज्यांना गावपळण ही काय भानगड आहे हे माहीत नाही ते कोकणातील लोकही गावंढळपणाचा शिक्का मारून मोकळे झाले आहेत. काय आहे हा गावपळणीचा प्रकार? सिंधुदुर्गात आचरे, चिंदर, मसुरे, देवगड आणि रत्नागिरीत लांजा तालुक्यातील वाघण या गावात गावपळण होते. संपूर्ण गावाने या दिवसात काही दिवस गावाबाहेर राहाण्याची परंपरा आहे. या गावपळणीत मालवण तालुक्यातील आचरे आणि चिंदरची गावपळण सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे. मसुरे गावातही गावपळण होते, पण ती एका वाडीपुरती मर्यादित आहे. दर तीन वर्षांनी येणारी गावपळण पूर्वी महिनाभर चालत असे. आधुनिक काळाचा स्पर्श झालेल्या या जमान्यात इतके दिवस घराबाहेर राहणं कुणालाही शक्य नसल्याने ही प्रथा आता सात, पाच आणि तीन दिवसांवर आली आहे. गावपळणीप्रमाणेच देवपळण अशी प्रथाही कोकणातील काही गावांमध्ये आहे. गावपळण व देवपळण या प्रथा नेमक्या कधी सुरू झाल्या याचे संदर्भ सापडत नाहीत. मात्र अनेक पिढ