पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोहत्या: न्यायालायचीही दिशाभूल

सनातनी दिशाभूल करण्यात किती पटाईत आहेत ते हा लेख आणि त्याला दिलेले उत्तर वाचल्यावर लक्षात येईल. मूळ लेख असा आहे. गोहत्याबंदीला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता का दिली? (ले० श्री. मिलिंद शेटे, पूर्वप्रसिद्धी : सांस्कृतिक वार्तापत्र) "गोहत्या बंदी" हा लढा कोण्या हिन्दू साधूचा, rssचा, नाही. 'स्वदेशी आंदोलन' हे अत्यंत तर्कशुद्ध यशस्वी आंदोलन देशभर नेणाऱ्या कै.ड़ॉ राजिव दीक्षित यांचा हा यशस्वी न्यायालयीन लढा आहे. (एक मुसलमान कसाई महंमद कुरेशी ह्याच्या विरुद्ध डॉ. राजीव दीक्षित ह्यांनी गोहत्येच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातील जिंकलेल्या दाव्याची ही माहिती तुम्हाला उद्बोधक वाटेल. – प्रा० मनोहर राईलकर) आपल्या देशाच्या शेतीच्या दृष्टीनं, जमिनीचा कस सुधारण्याकरता, राष्ट्रीय इंधनाची बचत करण्याकरता, प्रदूषण कमी करण्याकरता, स्वस्त औषधांकरता, अशा विविध कामाकरता गोवधबंदी आवश्यक आहे. त्या मागणीचा हिंदु किंवा मुसलमान धर्मांशी काडीचाही संबंध नाही. पण, हिंदूंच्या गटाकडून आलेली मागणी म्हणजे ती जातीय तरी असणार, नाही तर अंधश्रद्धेवर आधारित असणार, नाही तर तिच्या मागं काही तरी छुपा
चित्रपटाच्या निमित्ताने सुद्धा जातीय मानसिकतेचेच प्रदर्शन. आर्चीला तिच्या वडिलांनी लिहिलेले एक पत्र आणि त्याला दिलेले उत्तर प्रिय आर्ची... बाळा मी बोलतोय... तुझा तात्या.... माझ्या बाळा, तु जरी चिरडुन गेली आमचं आयुष्य तरी.. प्रिन्सनं तुमच्या सोबत जे केल ते लय वाईट... बाळा, त्याला काय माहीत माझ्या या काळजाच्या तुकड्याला मी किती जपलं होतं... तु तुझ्या आईला म्हनाली होती ना ! डोळ्यात पाणी आणुन ! तात्या बोलतील का....? हो मीच बोलतोय...!! बाळा मला विचारायचंय तुला काय कमी पडलो आम्ही तुला वाढविण्यात...? बाळा जातीपातीच्या चिखलातला मी नाही....! प्रत्येक हौस मौज हात जोडुन उभी होती तुझ्या समोर . आधुनिक जगातल्या आधुनिक जिवन शैलीत तुला वाढविले! तुला बुलेट, ट्रॅक्टर, कार सर्व चालवायला शिकविले! प्रिंन्स व तुझ्यात काही भेदभाव केला नाही... अशा वेळी मी काहीच न कमवणाऱ्या पोरा सोबत लग्न कसं मान्य करु..? कोणता गुण होता परशात म्हणून मी तुझा हात त्याच्या हातात द्यायचा होता..? किशोर वयात मन हळवं व शरीराची भुक तिव्र असते हे मान्य आहे मला..! पण तेवढ्या एकाच कामासाठी ज

अध्यात्म आणि सायन्स

चला, आज पुन्हा एकदा एका खोटारड्या पोस्टचा समाचार घेऊया. आधी ती पोस्ट वाचा आणि मग तिचे विश्लेषण वाचा. सुरुवातीला मूळची पोस्ट. अवश्य वाचा.... . अध्यात्म आणि सायन्स !! श्री !! देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई. आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू. 1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........ ह्यामागे

माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य

सध्या *'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'* या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. 1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो. 2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत अ

दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?....

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना लक्ष्य करणारी एक दिशाभूल करणारी कविता आणि तिला दिलेले उत्तर पहिल्यांदा ती संबंधित कविता वाचा. दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?.... देवाला फूल चढ़वल जात तेव्हा तुम्ही रागवता! मग मेणबत्ती पेटवतेवेळी, चौथरयावरील चादर चढ़वतेवेळी तुम्ही गप्प्प का? दाभोळकर...... माझा गणपती घरी येतो तेव्हा तुम्ही टिका करता! त्यांचा शांताक्लॉज येतो तेव्हा, त्याचा मसीहा येतो त्यावेळी तुम्ही गप्प का? दाभोळकर... माझ्या मुलांच जावळ उतरवण तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत! त्यांच मेरीच्या माडीवर देतेवेळी त्यांची सुंता होते त्यावेळी तुम्ही गप्प का?  दाभोळकर....... आमचे व्रत उपवास सण तुम्हाला नकोसे होतात! पण त्यांचा रोजाच्या वेळी, यांचा गुडफ्रायडे वेळी तुम्ही गप्प का?  दाभोळकर....... माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही त्यांच मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक ख्रिस्ती शाळेत येशु मूर्ती रूपान हज़र, त्यावेळी तुम्ही गप्प का?  दाभोळकर...... स्री शिक्षणातली हिंदू सावित्री कधी तुम्ही समजूनच घेतली नाही... कारण मुस्लिम बुरख्यातुन तुम्हाला पाश्चमात्य नग्नता चांगली वाटली..... आमचा