पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रहण

*ग्रहण काळात परातीमध्ये 90 अंशात मुसळ कसे उभे राहते अशी ‘भाबडी’ विचारणा करणारी पोस्ट सध्या फिरत आहे त्यास हे उत्तर...* मुसळ हे एक सरळसोट लाकूड असते व त्याचा तळ (कुटण्याचे टोक) हे सपाट असते. तसेच त्याचा तळभाग जड व किंचित पसरट असतो. कारण तळ जेव्हढा वजनदार तेव्हढी त्याला जास्त स्थिरता प्राप्त होते व कुटण्याची क्रीयाहि चांगली होते. लहान मुलांना खेळण्यास देण्यात येणारी डोलणारी बाहुली आडवी केली तरी न पडता उठून उभी राहाते. कारण तिचा तळभाग जड केलेला असतो.ह्याचसाठी डबलडेकर बसमध्ये खालच्या मजल्यावर उभे प्रवासी घेतात, पण वरच्या मजल्यावर नाही. तसेच जहाजात इंजिनारूम्स वा सामान ठेवण्याच्या जागा बोटीच्या तळभागातच असतात. त्यामुळे तिचा तळभाग जड होऊन बोट पाण्यावर हेलकावे न खाता स्थिर राहू शकते. एवढेच काय पण विमानातही कार्गो म्हणजे सामान व त्याचे इंजिनही त्याच्या पोटात म्हणजेच तळभागात असते, त्यामुळेच विमान हवेतही फार हेलकावे न खाता स्थिरापणे प्रवास करू शकते. *या गुणधर्माला भौतिकाशास्त्रात गुरुत्वामध्याचा ( centre of gravity) गुणधर्म असे म्हणतात.* *म्हणूनच मुसळच काय अशा आकाराचे कुठलेही लाकूड सपाट पृष

चला अंधश्रद्धेचे ग्रहण सोडवूयात!!!!

*चला अंधश्रद्धेचे ग्रहण सोडवूयात!!!!* येत्या २१जूनला एक सुंदर खगोलीय घटना घडणार आहे ती म्हणजे  सूर्य ग्रहण.उत्तर भारतातून काही भागात कंकणाकृती तर उर्वरित भारतात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसेल. ग्रहणाविषयी अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमज समाजात प्रचलित असतात.अशाच काही गैरसमजांचे निराकरण करण्याचा हा प्रयत्न!!! *ग्रहण अशुभ असते. ग्रहणे पाहू नयेत* ग्रहण ही खगोलीय घटना आहे.जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात तेव्हा चंद्रामुळे  सूर्यबिंब झाकले जाऊन सूर्यग्रहण होते. यात शुभ-अशुभ असे काही नाही *ग्रहणात हवा अशुद्ध होते* सुर्यग्रहणात चंद्राची सावली पृथ्वीच्या काही भागावर पडते.सावली ही सावलीच असते.झाडाची सावली,डोंगराची सावली किंवा चंद्राची सावली सारखीच असते.जर झाडाच्या सावलीत हवा अशुद्ध होत नसेल तर चंद्राच्या सावलीत देखील होणार नाही. *पाणी अशुद्ध होते -ग्रहण सुटल्यावर घरातील पाणी ओतून टाकून नवीन पाणी भरावे* ग्रहणात जर घरातील पाणी अशुद्ध होत असेल तर टाकीतले, नदीतले ,धरणातले पाणी सुद्धा अशुद्ध व्हायला हवे.घरातील पाणी ओतून देऊन टाकीतले पाणी भरणे हे तर्क दृष्ट्या सुद्धा हा