पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुराणातील वांगी: ककनमठ मंदिर

⛔ * गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणारे  ककनमठ मंदिर! * — कौस्तुभ शेजवलकर (14 jun 2021) "गुरुत्वाकर्षणाचे नियम सांगणाऱ्या मंदिराची गोष्ट" ह्या ककनमठ मंदिरासंबंधीच्या संदेशात त्याचे लेखक, विनीत वर्तक, हे अनाहूतपणे किंवा सहेतुकपणे उपायोजित विज्ञान (applied science) आणि मूलभूत विज्ञान (pure science) यांत गल्लत करत आहेत. आधार घेऊन, अडखळत चालणारं लहान मूल, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल ह्या गोष्टी शिकल्यावर मग आधाराशिवाय चालायला लागत नाही तर ते आधी आधाराशिवाय चालायला लागतं आणि नंतर कधीतरी ह्या गोष्टी, न्युटनचे गुरूत्वाकर्षणाचे नियम वगैरे शिकतं. एवढंच कशाला, रस्त्यावर उंच ताणलेल्या दोरावर कसरतीचे खेळ करणारे कित्येक डोंबारी तर बहुधा जन्मात कधीही न्यूटन, गुरुत्वाकर्षण, गुरूत्वमध्य, तोल यातल्या कशाशीही पाला न पडतादेखील न पडता आयुष्यभर कसरत करतात. त्यामुळे ककनमठ मंदिर हे आजही न पडता उभं आहे म्हणजे ते बांधणाऱ्या स्थापत्यकारांना गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि त्यांचं विज्ञान माहित होतं हा दावा, मूल आधाराशिवाय चालतंय, किंवा डोंबारी न पडता कसरती करतोय म्हणजे त्यांनाही गुरूत्वाकर्षणाचे नियम आणि विज

मुस्लिम सरकारी नोकर, चार बायका आणि पेंशन

*डोके थंड ठेवून वाचा.* *विषयाची गंभीरता समजा.*  समजा एक *मुस्लिम* गव्हर्नमेंट ची नोकरी करून जेंव्हा निवृत्त झाला आणि त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या जर चार बायकां असतील तर त्यांना पेंशन कसे देतात?  *उत्तर* :- नॉमिनेशन बघितलं जातं आणि नक्की केलं जातं की किती टक्के कुणाला द्यायचे ते. नॉमिनेशन नसेल तर चौघीना 25% वाटून देतात. एखादी मेली तर बाकीच्या तिघींचा 33.33% देतात. दुसरी मेली तर बाकी जिवंत असणार्या दोघीं ना 50%वाटून देतात.  तिसरी मेली तर शेवटची ला 100% पेंशन देतात.  *आता विचार करा*..... की  पहिली 60 , दुसरी 50 तिसरी 40 आणि चवथी 30  वर्षाची असतील तर  ,आणि सर्रास सगळ्या 70 वर्षे जगल्या तर  , एकूण  10+20+30+40 =100 वर्ष  पेंशन मिळवणार.   अन्य धर्माची पत्नी 10 किंव्हा जास्तीत जास्त 20 वर्ष पेंशन मिळवणार.   म्हणजेच चवथी पत्नी ही आयुष्यभर  पेंशन मिळविण्या साठी मुस्लिम वयस्करा शी रियायरमेंट पूर्वी लग्न करते.  आता हा सर्व्हे करणं जरुरी आहे की किती टक्के मुस्लिम वयाच्या ५५ वर्षां नंतर शरीयतचा फायदा घेऊन ४ लग्न करतात ?..... जर ही टक्केवारी मोठी असेल तर सरकारी तिजोरीतून मुस्लिम महिलांची कायदेशीर

क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं?

 क्या शिवलिंग रेडियोएक्टिव होते हैं? हाँ १००% सच है!! भारत का रेडियो एक्टिविटी मैप उठा लें, हैरान हो जायेंगे! भारत सरकार के न्युक्लियर रिएक्टर के अलावा सभी ज्योतिर्लिंगों के स्थानों पर सबसे ज्यादा रेडिएशन पाया जाता है। ▪️ शिवलिंग और कुछ नहीं बल्कि न्युक्लियर रिएक्टर्स ही तो हैं, तभी तो उन पर जल चढ़ाया जाता है, ताकि वो शांत रहें। ▪️ महादेव के सभी प्रिय पदार्थ जैसे कि बिल्व पत्र, आकमद, धतूरा, गुड़हल आदि सभी न्युक्लिअर एनर्जी सोखने वाले हैं। ▪️ क्यूंकि शिवलिंग पर चढ़ा पानी भी रिएक्टिव हो जाता है इसीलिए तो जल निकासी नलिका को लांघा नहीं जाता। ▪️ भाभा एटॉमिक रिएक्टर का डिज़ाइन भी शिवलिंग की तरह ही है।[1] ▪️ शिवलिंग पर चढ़ाया हुआ जल नदी के बहते हुए जल के साथ मिलकर औषधि का रूप ले लेता है। ▪️ तभी तो हमारे पूर्वज हम लोगों से कहते थे कि महादेव शिवशंकर अगर नाराज हो जाएंगे तो प्रलय आ जाएगी। ▪️ ध्यान दें कि हमारी परम्पराओं के पीछे कितना गहन विज्ञान छिपा हुआ है। ▪️ जिस संस्कृति की कोख से हमने जन्म लिया है, वो तो चिर सनातन है। विज्ञान को परम्पराओं का जामा इसलिए पहनाया गया है ताकि वो प्रचलन बन जाए और हम भा

३३ कोटी देव

इमेज
  *हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 कोटि देव म्हणुन मजा उडवतात। त्या बद्दल स्पष्टीकरण*👇 *प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?* उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड' असाच वाटत असतो  पण ,  येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.   मुळात संस्कृतमधील  "कोटि"  या शब्दाचा अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे.  ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.  त्यांच्यात ,  ८ वसू,  ११ रूद्र,  १२ आदीत्य,  १ इंद्र १ प्रजापती  असे पाच स्तर आहेत . प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे. अष्टवसूंची नावे -  आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास .  अकरा रूद्रांची नावे -  मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज. बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू १ इंद्र आणि १ प्रजापती असे एकंदर  ८+११+१२+१+१ = ३३... ही माहीती सगळ्याच ग्रूप
 When the day and the night are equal (21st March and 23rd September) the sun appears every 5-minutes in each of the 5 windows of Padmanabhansami Temple in Kerala. Built in 1566 ce What an Extraordinary calculations someone must have done 500 years ago! Extraordinary Architecture, Precise Calculations, Mesmerising Visual effects!! उत्तर यात विशेष ते काय? आपल्या घरात देखील ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक कोनात प्रकाश पडतो, त्याला कारण पृथ्वीचे सूर्याभोवती होणारे भ्रमण आणि त्यामुळे होणारे उत्तरायन-दक्षिणायन  हे आहे. मंदिरांची दिशा कशी असावी हे ठरलेले असते.  त्यानुसार सूर्याची किरणे पडणारच. या मंदिराच्या ठिकाणी असेच उंच सार्वजनिक संडास बांधून त्याला अशाच खिडक्या बनवल्या तरी असाच ठराविक दिवशी, धरावीक वेळी सूर्यप्रकाश पडेल.
 *1) अंत्यसंस्कारवरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?* *Infections spread टाळण्यासाठी.* *2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?* *Infections spread टाळण्यासाठी.* *3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?* *(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)* *कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.* *त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.* *या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.* *काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.* *त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.* *इथे कारण उलटे असते* *कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.* *4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?* *आलं का logic लक्षात.* *5) शौचास बसून करण्याची

‘मारुतीस्त्रोत्र’च्या खर्‍या अर्थाची थापेबाजी

 *मारुतीस्तोत्र खरा अर्थ* इंग्लंड मधील शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी लावलेल्या ‘सिम्युलेरीटी थेरम’ आणि ‘थर्मोडायनॅमिक्स ऑफ ब्लॅकहोल्स’ या दोन क्रांतिकारी शोधामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली. शास्त्र हे तर्क आणि सिद्धांत सिद्ध करण्याच्या कसोटीवर सिद्ध होते हे या शरीराने विकलांग पण बुद्धीने अत्यंत कणखर असलेल्या शास्त्रज्ञाने जगाला दाखवून दिले. ताऱ्याचा अंत होतो, तसाच संपूर्ण विश्वाचाही अंत होऊ शकतो असा निष्कर्ष हॉकिंग यांनी मांडला. जगभर हा सिद्धांत चर्चेचा विषय झाला. भारतीय अणू वैज्ञानिक श्री रामदास स्वामी......! खरेतर भारतीय विद्वान शास्त्रज्ञांना धर्माच्या कोंदणात बसवल्यामुळे त्यांना संत पद प्राप्त झाले पण त्यांनी मांडलेल्या सिद्धांताचा बोजवारा उडाला. समर्थ रामदास स्वामी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. समर्थांनी लिहिलेले मारुती स्तोत्र धर्माची झापडे काढून शास्त्रीय नजरेने पाहीले तर फक्त मनन आणि चिंतन करून त्यांनी जे साहित्य (खरेतर शोध निबंध) लिहून ठेवले आहेत त्याचे अनन्य साधारण महत्व अधोरेखित होते. समर्थांना 'मारुती' या अणू शक्तिला ब्रिक हिस्ट्री ऑफ टाइम (विश्वो
 आमच्याच धर्माबद्दल का करता तक्रार? (^m^) (^j^) (मनोगते) *कोणत्याही धर्माप्रमाणे हिंदू धर्म हा जन्मत: लाभत असल्याने या देशातील ८०% लोक परंपरेने हिंदूच आहेत. चळवळीतील कार्यकर्तेही स्वाभाविकच प्रामुख्याने हिंदूच असणार. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत अंधश्रद्धांवर साहजिकच ते प्रथम बोलणार. त्यामुळे काहीशी अपरिहार्यता म्हणून स्वधर्मीय टीका मान्य व सहन केली पाहिजे. तसेच आपल्या देशातील परस्पर धर्माच्या टीकेबाबत असलेली अनुदारता लक्षात घेतली, तर मुस्लिम वा अन्य धर्मियांनी हिंदू धर्मावर टीका केलेली आपल्याला अजिबात रुचत नाही ही वस्तुस्थिती आहे. (हिंदूंत तर एका जातीने दुसऱ्या जातीचे दोष दाखविले. उदा. महारांनी मराठ्यांचे, धनगरांनी ब्राह्मणांचे दोष दाखवले तरी रुचत-पचत नाही. ) हीच गोष्ट इतर धर्मीयांबाबत खरी आहे.* *दुसरे म्हणजे बौद्ध, खिश्चन, मुस्लिम हे धर्म अलीकडच्या २ ते २ ।। हजार वर्षांतील आहेत. हिंदू धर्माच्या निर्मिती कालाबद्दल विविध मते असली, तरी तो या धर्मापेक्षा २ ते २ ।। हजार वर्षांनी नक्कीच जुना आहे. देवांची संख्याही फार प्रचंड आहे, तशीच उत्सवांचीही. (बाकीचे प्रमुख धर्म एकेश्वरवादी आहेत.)  पुरा
 * We The Indians*......  Question - How many people are worried about BSNL?  Answer - Everyone.  Question - How many people use BSNL's SIM?  Answer: None.  Question - How many people worry about government school?  Answer - All.  Question - How many people have children in government school?  Answer: None.  Question - How many people want a polythene free environment?  Answer - All.  Question - Who does not use polythene?  Answer - All do.  Q: Who wants a corruption-free India?  Answer - All.  Question - How many people did not take bribe for their selfishness?  Answer - Everybody has taken a bribe in some form or the other.  Question - How many people worry about falling rupee?  Answer - All do.  Question - How many people buy only indigenous goods?  Answer: None.  Q: Who is unhappy with the deteriorating traffic conditions?  Answer - All.  Question - Who follows 100% traffic rules?  Answer: None.  Question - Who wants change?  Answer - All.  Question - How many people want to ch

इंडोनेशियन सरस्वतीच्या मूर्तिचा फोटो

 ही सरस्वती देवी आहे वॉशिंग्टनमध्ये. अमेरिकेत! तिच्या पायाशी बसून ३ विद्यार्थी अभ्यास करत आहेत. सरस्वतीच्या  पायाशी बसलेला एक मुलगा आहे - बराक ओबामा. वंशाने आफ्रिकन, कर्माने अमेरिकेचे अध्यक्ष, धर्माने ख्रिश्चन.  लहानपणी इंडोनेशिया मधील शाळेत शिकलेला हा मुलगा अमेरिकेचा अध्यक्ष झाल्यावर, इंडोनेशियाने ही सरस्वतीची मूर्ती त्यांना भेट दिली. एका मुस्लिम धर्मीय देशाच्या सरकारने, ख्रिश्चन धर्मीय देशाच्या अध्यक्षांना दिलेले सन्मानचिन्ह!  'सुसंस्कृत'पणा म्हणतात तो हा. जे सुसंस्कृत असतात त्यांना विद्येचे, विद्येच्या देवतेचे महत्व.  विद्येच्या देवतेची पूजा करायला - धर्म, देश, वंश, पदवी आड येत नाहीत. *दिपाली पाटवदकर* इंडोनेशियन सरस्वतीच्या मूर्तिचा फोटो आणि त्याखाली दिपाली पाटवदकर यांची पोस्ट सध्या फिरत आहे. या पोस्टला पार्श्वभूमी आहे यशवंत मनोहर यांनी मंचावर सरस्वतीची प्रतिमा ठेवल्याने पुरस्कार नाकारल्याची. या पोस्ट मधील बाबींची तपासणी न करता वाचल्यास कोणीही लेखिकेला अभिप्रेत असे पुढील निष्कर्ष काढू शकेल:  १) धर्माने ख्रिश्चन असलेले बराक ओबामा सरस्वतीच्या पायी बसून अभ्यास करीत होते.  २) ओब
 लोकांच्या श्रद्धांवर टीका करून त्यांच्या भावना दुखावणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचे समाजसेवा प्रेम हे बेगडी आहे. अंधभक्तांच्या या दूषित दृष्टिकोणाला उत्तर - जेट जगदीश. देवळे, धर्म यामुळे निर्माण झालेल्या अंधश्रद्धामुळे माणसे मानसिक गुलाम होतात, आणि पिढ्यानुपिढ्या कर्मकांडात अडकतात. डोके गहाण ठेवून गुप्तधनासाठी नरबळी सारखे आणि भूत अंगात येणे यासाठी भगत वा मांत्रिकाकडून मारझोड सहन करणे अशी अत्यंत विघातक कृत्येही करतात.  धार्मिक अंधश्रध्दा हा प्रकार श्रध्देच्या क्षेत्रातला काळाबाजार असतो. काळाबाजार करणारांची कुठली जात आणि कुठला धर्म आहे, हे विचारायची पध्दत नाही. त्यामुळे अंनिसनं सर्व जातिधर्मांमधल्या अंधश्रध्दांना विरोध करत असते. आधुनिक वैज्ञानिक अंधश्रद्धा आहेतच. यावर कोणाचे दुमत नाहीत. पण मानसिक गुलामगिरीशी तुलना करता त्या फारच वरवरच्या आहेत. त्यामुळे अंनिस धार्मिक अंधश्रद्धावर जोर देते. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करायचा प्रयत्न करते.  एवंच अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचे समाजसेवा प्रेम हे बेगडी आहे असे म्हणणे हा तर तुमचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन झाला. म्हणून हा आरोप एकाच

ख्रिसमस ट्री आणि तुळस

 झाडाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठेवणारे धर्मांध विकृत – जेट जगदीश "मी तुळशीच्या झाडाचे 50 फायदे सांगतो, तुम्ही ख्रिसमसच्या झाडाचे फक्त 2 फायदे सांगा. अंधश्रद्धा निर्मुलन सप्ताह स्पेशल..." काही विकृत धर्मांधांकडून अशी आव्हान देणारी पोस्ट गेल्या दोन-चार दिवसापासून अनेक ग्रुपवर फिरत आहे. त्यांच्या या खोडसाळ पोस्टला उत्तर... मुळात ख्रिसमस ट्री हा नाताळाच्या दिवशी केवळ सुशोभिकरणासाठी ख्रिस्ती बांधव उपयोगात आणतात. त्यापासून समाजाला काहीही धोका नाही. ख्रिसमस झाडाचे धार्मिक महत्व श्यून्य असते. ही फक्त सजावटीची प्रथा आहे. ख्रिसमस झाड सजवले नाही तर ख्रिसमस होत नाही, असे काही नाही. इथे अंधश्रध्देचा संबंध येतोच कुठे? म्हणून तुळशीच्या झाडाशी तुलना करणे सर्वथा चूक आहे.  ख्रिसमसचा दिवस हा येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस असतो. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. जर परशुराम, कृष्ण, राम, गणेश या काल्पनिक देवांच्या जन्मतारखा माहित नसूनही त्यांच्या जयंत्यांचे दिवस साजरे करणे ही हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून अंधश्रद्धा नाही. पण ज्यांच्या जन्मतारखा माहित आहेत असे प्रत्यक्षात होऊन गेलेले बुद