मीडियावाले ज्यांचा श्रेष्ठ समाज सेवक किंवा विवेकवादी किंवा विचारवंत म्हणून उल्लेख करत असतात ते कुमार सप्तर्षि, शाम मानव, हमिदभाय दाभोळकर, तृप्ति देसाई, तिस्ता सेटलवाड, अमर्त्य सेन, अरूंधती राॕय करोंनाच्या यद्धात कुठलीच आघाडी  सांभाळताना दिसत नाहीत. निदान करोंनाचा कहर चालू असताना मशिदीत गोळा होऊ नका, नमाज पढून करोंना जात नाही एवढी तरी अंधश्रद्धा दूर करताना दिसत नाहीत. सगळ्या देवळात जाऊन अमका हक्क - तमक्या  हक्काच्या नावाखाली धुडगूस घालत असतात तेही डोंगरी भागात किंवा मालेगावात जाऊन रस्त्यावर जमू नका, गर्दी करू नका, पोलिसांना सहकार्य करा असे सांगायला दिसत नाहीत. सगळेच काम  सरकारी पातळीवर चालू आहे किंवा  एखादी संघटना! बाकी सगळे पोलिस आणि आरोग्य कर्मचारीच सांभाळताहेत. सध्याच्या दिवसात उणी दुणी काढायची वेळ नाही, पण तमाम शाहू फुले आंबेडकर भक्त, डावे बाराही महीने हिंदूंच्या चुका शोधून शोधून दाखवण्यात मश्गुल असतात ते सगळे दिवाभिता सारखे  लपून बसलेत. यांच्या सेवादल, युवक बिरादरी सारख्या  छान छान संघटना / कार्यकर्ते आहेत त्यांना सामाजिक भान असावे अशी अपेक्षा होती. एरवीच्या १२ महिन्यात उधळलेला उत्साह(उन्माद) घेऊन ही मंडळी मैदानात उतरली तर सरकारवरचा आणि वैद्यकीय टीमवरचा भार कमी होईल. हे सगळे स्वतःला दीन-दुबळ्यांचे, अल्पसंख्यकांचे तारणहार आणि समाज सेवक मानतात म्हणून हे लिखाण. *माझा आतला आवाज सांगतोय की हे सगळे पंचतारांकित वृत्तीचे ह्यातलं काहीही करणार नाहीत. मात्र, करोनाचं संकट संपलं की सरकारचं हे चुकलं, सरकारने ते का नाही केलं वगैरे सूर लावून अभद्र आणि अमंगळ कोल्हेकुई नक्की करतील.*


~~~~~

मुख्यमंत्री व पंतप्रधान यांनी लॉक डाउनचे जे काही आदेश दिलेत ते सर्व देशवासीयांना दिले आहेत, त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या, धर्माच्या, जातीच्या लोकांनाच दिले आहेत असे नाही. त्यास सर्वांनी पाठिंबा दिला आहे, कोणीही विरोध केलेला नाही. त्यामुळे हे आदेश सर्वांनाच लागू आहेत. त्या आदेशांची अमलबजावणी सरकारी यंत्रणा करीत आहेत व त्यात जिथे जिथे स्वयंसेवकांची आवश्यकता आहे तिथे तिथे लोक (अंनिस वाल्यांसाहित) सरकार सोबत जॉइन होत आहेत. अन्य लोकांना मध्ये ढवळाढवळ करायला (घराबाहेर पडायला सुद्धा) मनाई आहे हे काही बिनडोक लोकांना कळतच नाही व अशा राष्ट्रीय आपत्ति प्रसंगी पुरोगामी, प्रतिगामी, हिंदू, मुस्लिम असल्या गोष्टी घुसडुन या राष्ट्रीय कामाला पक्षीय, जातीय, धार्मिक रंग देत आहेत याची त्यांना लाज कशी वाटत नाही? देशात चाल्लय काय हे बोलतात काय??? लॉक डाउन मध्ये सर्व भारत घरात बसला आहे तो सरकारी आदेशामुळे बसलाय, दिवाभितासारखा नव्हे हे कळायची अक्कल पोस्ट-लेखकाला नसावी? 

मशीद किंवा चर्च मध्ये लोक जमा होत असतील तर लॉक डाउन मध्ये सरकारी यंत्रणा काळजी घेतीलच. ज्याला सरकार, मोदी, ठाकरे अकार्यक्षम वाटतात, काळजी घेऊ शकत नाही असे वाटते त्याने स्वतः हिम्मत (असेल तर) दाखवावी व असल्या कुजक्या पोस्ट टाकण्याऐवजी जिथे जिथे लोक जमा होतात तिथे जावे व त्यांना पांगवावे.

आणि 22 तारखेला सायंकाळी पाच वाजताच टाळ्या व थाळ्या वाजवत हजारोंच्या संख्येने गल्लोगल्ली, रस्त्या रस्त्यावर उतरून लोक मोदी यांचा जनता कर्फ्यू तोडत होते, कोरोनाच्या प्रसाराला भरभरून हातभार लावत होते, तेंव्हा हे पोस्ट लेखक कुठल्या बिळात दडून बसले होते? गोमूत्र पार्टीसाठी लोक गोळा होत होते तेंव्हा हे लेखक कुठे होते? आपलं ठेवावं झाकून, दुसर्‍यांचं पाहावं वाकून अशा या समाजविघातक प्रवृत्ती सामाजिक सलोख्याला धोका आहेत, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?