हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का? १) *लग्नात मांडव कशासाठी ???* = मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!! २) *विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???* = माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!! ३) *नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???* =माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!!+++ ४) *मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???* = मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!! ५) *लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???* = प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही हे सांगण्यासाठी !!! ६) *लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???* = तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !!!+++ ७) *लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???* = तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची ला...
सध्या *'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'* या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. 1) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो. 2) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत अ...
सध्या सोशल मीडियावर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना आरशाची काच कशी आपोआप फुटते याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करताना मूर्तीच्या समोर एक व्यक्ती आरसा धरून उभी असते. मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढली की समोरच्या आरशाची काच आपोआप फुटते. त्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की ही काच मूर्तीमध्ये असलेल्या शक्तीमुळे फुटली आहे. हा चमत्कार म्हणजे हातचलाखी आहे. मूर्तीसमोर धरलेला आरसा प्लॅस्टिकच्या फ्रेमचा आहे. मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी काढली की आरशाच्या पाठीमागून अंगठ्याने जोरात दाब दिला जातो आणि त्यामुळे आरशाची काच फुटते. हा चमत्कार कुणीही करू शकतो. प्लॅस्टिकच्या फ्रेमचा आरसा वापरण्याऐवजी लाकडी फ्रेम असणारा आरसा वापरून कुणीही हा चमत्कार करून दाखवावा. त्यांना तो करता येणार नाही. कारण काचेच्या पाठीमागे जाड लाकडी आवरण असल्याने अंगठ्याने कितीही दाब दिला तरी काच फुटणार नाही कुठल्याही मंत्रामध्ये कसलीही ताकद नसते. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हटल्याने कुठल्याही मूर्तीमध्ये प्राण येत नसतो, हे वास्तव आहे. परंतु लो...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा