मुख्य सामग्रीवर वगळा




विठ्ठलाचा वारकरी,चालून चालून थकलाय

रस्त्याच्याच कडेला पदपथावर झोपलाय

पायात नाही चप्पल त्याच्या...

हजला मात्र विमान आहे

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


बैलपोळा झाला, बैलाची तब्येत मस्त आहे

वसुबारसेला सवत्स धेनु , धन्यासवे स्वस्थ आहे

एका सणात मात्र तिची...

सुऱ्याखाली मान आहे

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


पाऊस यंदा चांगला झाला ,हिरवगार गवत आहे

बाळुमामांची मेंढरं ,जिकडे तिकडे चरत आहेत

बकरी ईदला मात्र त्यांचा ...

कसाया हाती कान आहे

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


पाच वेळा नमाज पडून मुल्ला देतो आहे बांग

चार पत्नी मिळून त्याच्या ,मुलांची लावत आहेत रांग

आयुष्यभर त्यांच्या नशिबी...

बाळंतपणाची घाण आहे

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


शबरीमलात रजस्वलांना ,घुसवण्यास सर्व आतूर आहेत

मशीदबंदीवर ''तिच्या" मात्र , गप्प सारे फितूर आहे

रणरणणाऱ्या उन्हामध्ये ...

काळ्या बुरख्यात जनान आहे

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


फटाके मुक्त दिवाळी, न्यायदेवतेचा आदेश आहे

परंपरांची लाज बाळगा, कारण आपलाच स्वदेश आहे

डिसेंबरच्या रात्री मात्र...

झगमगते आसमान आहे

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


सीमेवरती जवान हुतात्मा, "ते तर त्याचे कामच आहेे "

नक्षल्यांकडून पोलिसांचा खात्मा, " तरी वंचित शोषित वामच आहेत"

कसाई एखादा टिपल्यावर मात्र...

सुतकात बुद्धिमान आहेत

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


वयात आलेल्या कोवळ्या कळ्या, वाळवंटी सरडे खुडत आहेत

बुरख्याआडच्या काळ्या वास्तवात, कित्येक गुलाब कुढत आहेत

ताईला माझ्या लोक आता...

म्हणत अम्मी जान आहेत

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


धर्मांतरण ही तर आता , नवीन इथली फॅशन आहे

धर्माभिमान मागासलेपण अन् "मॉडर्न लाईफ" ॲट्रॅक्शन आहे

भगत सावरकर सुभाष यांच्या...

जागी शाहरुख-सलमान आहेत

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


छत्रपतींनी वाचवलेल्या, भूमीवर आम्ही जगतो आहोत

एकराचे सोडा गुंठ्याचे बोला, ऐय्याश सुखे भोगतो आहोत

रायगडच्या समाधीवर झेंडूचा हार ...

प्रतापगडचा उरूस तुफान आहे

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत


तेहतीस कोटी आमचे देव, पायर्‍यांखाली सडत आहेत

अवशेषांवर शतकानुशतके , नव्या मशिदी चढत आहेत 

हक्काच्या जागेसाठी भीक मागत...

कृष्ण आणि राम आहेत

कारण आपल्या हिंदुस्थानात, सर्व धर्म समान आहेत...

कोणी लिहिली माहिती नाही पण वाचना योग्य .



 विठ्ठलाचा वारकरी

चालतच करतो वारी

परंपराच आहे तशी

त्याला कोण काय करी

हज व वारीची तुलना

फक्त निर्बुद्धपणा आहे 

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


बैल पोळा, वसुबारस

जोरात साजरे होत आहेत

इथे आहे गोहत्या बंदी असून 

गोशाळेत गाई मरत आहेत

एका सणाची माहिती

खोटेपणाने देत आहेत 

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


यज्ञात पशुबलीची प्रथा होती

त्याचा पुरावा सुद्धा आहे

कित्येक जत्रांमध्ये, देवळात

पशुबली प्रथा चालू आहे

मात्र बकरी ईदला मेंढीचा

ढोंगी कळवळा येतो आहे

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


सकाळ संध्याकाळ

कुटतात टाळ ढोल

चार पत्नींचे गणित

ठरले आहे पूर्ण फोल

बाळंतपणाला घाण म्हणणे

ही यांची विकृती आहे

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


रजस्वलांना अपवित्र मानणे

हीच एक विकृती आहे

त्यासाठी महिला मशिदबंदीचा

ते निर्लज्ज सहारा घेत आहेत

अंगभर कपड्यांचा हट्ट वाले

काळ्या बुरख्यात अडकत आहेत

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


फटाके वाजवणे ही परंपरा

समजणे हेच लज्जास्पद आहे

दीड टक्के लोक डिसेंबरात

आसमान झगमगवतात

असे खोटे दावे करणे

हाच यांचा धंदा आहे

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


पुस्तके वाचणारा नक्षली

अशी यांची व्याख्या आहे

शस्त्रास्त्रे बाळगणारा मात्र

यांचा मोठा देशभक्त आहे

निष्पापांचे बळी घेणे

हा यांचा छंद आहे

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


आपल्याच अस्पृश्य भगिनींची

अब्रू नियमित लुटत आहेत

राजस्थानातले बालविवाह

ढेकरा देत पचवत आहेत

बुरख्या आडच्या अम्मांसाठी

खोटे कढ काढत आहेत

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


मानवतेला काळिमा अशी

यांची जाती प्रथा आहे

या अमानुषतेला कंटाळून

लोक धर्म त्यागत आहेत

विशिष्ट नटांच्या नावाने

सतत बोटे मोडत आहेत

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


छत्रपती राजे रयतेचे

सर्व जाती धर्मियांचे

मृत शत्रूलाही त्यांनी

सन्मानच दिला आहे

त्यांचे नाव वापरून

हे बदनामी करत आहेत

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत


बौद्ध लेण्यातील मूर्ति फोडून

मंदिरच आहे ते सांगणारे

मशि‍दीवर आपला अधिकार

खोटेपणाने सांगत आहेत

राम कृष्ण आदि देवांना

मतांसाठी वापरत आहेत

कारण आपल्या भारतात

धर्मांध खूप माजत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..!

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..!   म्हणून  गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...! 🤔 मित्रांनो, शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सवाचे जनक बाळ गंगाधर टिळक. यांनी गणपती बसविला. दहा दिवसांपर्यंत सभा-सम्मेलने घेतली. दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते.           एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..! मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला... गणपती बाटला, गणपति बाटला म्हणून टिळकांवर खेकसायाला लागले. "हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला, चांभाराने धर्म बुडविला..!"   तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती. टिळक म्हणाले - "ओरडू नका. धर्म कशाला बुडू द्यायचा. त्यापेक्षा  आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू  (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू...) अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली! ✍🏻 - डॉ. नरेंद्र दाभोळकर *या दाभोळकरांच्या बदनामीकारक पोस्टला उत्तर... – उत्तम जोगदंड.*

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का? १) *लग्नात मांडव कशासाठी ???* = मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!! २) *विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???* = माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!! ३) *नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???* =माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!!+++ ४) *मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???* = मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!! ५) *लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???* = प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही  हे सांगण्यासाठी !!! ६) *लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???* = तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !!!+++ ७) *लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???* = तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी

मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली?

 *एका सोनाराचा दाबलेला इतिहास....* ब्राह्मणद्वेषापायी आपल्या शाळेत कोणीतरी फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली असे शिकवले जाते आणि खरा इतिहास लपवला जातो. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढण्यापूर्वी दोन वर्षे मुंबईमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी मुलींसाठी शाळा काढलेली होती या शाळेत सर्व जातीजमातीच्या मुलींना प्रवेश होता गेल्या २५० वर्षात भारतात अलौकिक चारित्र्याची व कर्तुत्वाची जी माणसे होऊन  गेली त्या सर्व मंडळीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांचे इतका प्रचंड माणूस कोणीही दाखवता येणार नाही १८३२ साली त्यांनी Bombay Education Society काढली आणि पुढे एलीफेस्टॅन कॉलेज काढले १८४५ साली students literrary and scientific society ची स्थापना केली आणि स्वतःच्या घरात मुलींची शाळा काढली हि शाळा काढल्याबद्दल लोकांनी त्यांना सळो कि पळो करून टाकले Grant Medical College काढले मुंबई विद्यापीठ स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता पहिली भारतीय रेल्वे सुरु करण्यात नानांचा मोठा सहभाग होता स्त्रियांसाठी सूतिकागृहाची उभारणी केली ख्रिश्चन धर्माचे आक्रमण थोपवून धरले मुंबईत पहिली सूत गिरणी काढली मराठी व संस्कृत भाषण प्रतिष