(१) एकाही नदीला शबनम, शबाना, रुखसाना असे नाव नाही, कारण गंगा यमुना नर्मदा सारख्या अनेक नद्या अनादी काळापासून आहेत.

 (२) अब्दुल, सलीम चे नाव  एकाही पर्वताला देता आले नाही, कारण हिमालय, निलगिरी असे अनेक पर्वत अनादी काळापासून आहेत.

 (4) पींपळ वड,लिब सारख्या अनेक झाडांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?

 (५) तुळशी, अर्जुन ,पळस अशा अनेक वनस्पतींची नावे उर्दूमध्ये का नाहीत?

 (६) आयुर्वेदाची औषधी प्रत्येकाला लागते, पण हे वेद नाव उर्दूमध्ये का नाही?

 (७) रहीम, अकबर हे नाव एकाही महासागराला  देऊ शकले नाहीत, कारण प्रशांत, हिंदी महासागर सारखे अनेक महासागर अनादी काळापासून आहेत.

 (8) चार दिशांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?

 (9) नेमक्या औषधाला रामबाण उपाय का म्हणतात, अल्लाबाण, येशूबाण का नाही?

 कारण :-

 मुघलांनी केवळ मंदिरे पाडून मशिदींची, गावांची आणि शहरांची नावे बदलली आहेत.


 नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे अजूनही चिरंतन आहेत.

 हे शाश्वत सत्य आहे...

यालाच म्हणतात सनातन...🚩🕉🙏🏻

।। जय श्रीराम ।।

।। जय हिंदुराष्ट्र ।।

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

उर्दू भाषेत नदी, पर्वत झाडे इत्यादींना नावे नाहीत म्हणून हिणवणार्‍या पोस्टला उत्तर: 

 

उर्दू भाषेला हिणवण्यासाठी अत्यंत खुळचट असे युक्तिवाद करणारी एक पोस्ट फिरत आहे त्या पोस्टच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर पुढील प्रमाणे: 

मुद्दा: 

(१) एकाही नदीला शबनम, शबाना, रुखसाना असे नाव नाही, कारण गंगा यमुना नर्मदा सारख्या अनेक नद्या अनादी काळापासून आहेत.


उत्तर: 

उर्दू भाषेचा विकास होणे दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात १२व्या शतकात सुरू झाले. उर्दू भाषा स्थानिक भाषेवर आधारित होती आणि तिच्यावर अरेबिक, पर्शियन आणि तुर्की भाषेचा प्रभाव होता. तिची लिपि अरेबिक लिपीवर आधारित आहे. असे असताना भारतात अनादीकाळापासून वाहणार्‍या गंगा, यमुना, नर्मदा या नद्यांना उर्दू नावे कशी असतील? अशाच नद्या अन्य कित्येक देशांत देखील अनादीकाळापासून वहात आहेत. मग त्यांना तरी हिंदू नावे कुठे दिसतात? नदीला तिकडे नदी मानतात, म्हणून इथल्यासारख्या नदीवरच्या भाकडकथा तिकडे नसतात. तसेच कित्येक शतके या भूप्रदेशावर राज्य करून देखील पर्वत, नद्या, झाडे इत्यादीची नावे मुस्लिम शासकांनी बदलली नाहीत त्याचे काय? 


मुद्दा:  

(२) अब्दुल, सलीम चे नाव  एकाही पर्वताला देता आले नाही, कारण हिमालय, निलगिरी असे अनेक पर्वत अनादी काळापासून आहेत.


उत्तर: याचे उत्तर सुद्धा मुद्दा क्रमांक १ प्रमाणेच आहे. 


मुद्दा: 

 (4) पींपळ वड,लिब सारख्या अनेक झाडांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?


उत्तर: 

या झाडांना उर्दू भाषेत नावे आहेत. पोस्ट लिहणार्‍याला ती माहिती नसावीत याचे आश्चर्य वाटत नाही.  



मुद्दा: 

 (५) तुळशी, अर्जुन ,पळस अशा अनेक वनस्पतींची नावे उर्दूमध्ये का नाहीत?


उत्तर: 


याचे उत्तर मुद्दा क्रमांक ४ प्रमाणे आहे. 


मुद्दा: 

 (६) आयुर्वेदाची औषधी प्रत्येकाला लागते, पण हे वेद नाव उर्दूमध्ये का नाही?


उत्तर: 

१२व्या शतकात विकसित होत असलेल्या उर्दू भाषेत हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या वेदाचे नाव कसे असेल? 


मुद्दा:  

 (७) रहीम, अकबर हे नाव एकाही महासागराला  देऊ शकले नाहीत, कारण प्रशांत, हिंदी महासागर सारखे अनेक महासागर अनादी काळापासून आहेत.


उत्तर: 

महासागराला जी नावे पडलेली आहेत ती हिन्दी किंवा भारतीय भाषेत आहेत काय? मग उर्दूचा आग्रह का?  


मुद्दा: 

 (8) चार दिशांची नावे उर्दूमध्ये का नाहीत?


उत्तर: 

आहेत की! फक्त डोके जिथे गहाण ठेवले आहे तिथून सोडवून आणावे, म्हणजे सापडतील. 


मुद्दा: 

 (9) नेमक्या औषधाला रामबाण उपाय का म्हणतात, अल्लाबाण, येशूबाण का नाही?


उत्तर: 

औषधाच्या प्रभावाच्या तीव्रतेला देवाचे नाव देण्याचा बावळटपणा अन्याधर्मीय करत नाहीत.  


 

मुद्दा:  

कारण :-

 मुघलांनी केवळ मंदिरे पाडून मशिदींची, गावांची आणि शहरांची नावे बदलली आहेत.


उत्तर: 

हे अर्धसत्य आहे. गावे शहरे त्यांनी वसवली आहेत आणि त्यांस आपली नावे दिली आहेत. मंदिरे त्यांनी जरूर पडली आहेत. परंतु त्यापेक्षा भयानक काम हिंदूंनी केले आहे ते बौद्ध धम्मावर आक्रमण करून, त्यांच्या लेण्यांवर आक्रमण करून (लेण्याद्री, एकवीरा आणि अन्य कित्येक मंदिरे आणि अनेक बौद्ध गुंफा आहेत, ज्यांच्यावर जबरदस्तीने हिंदूंनी आक्रमण केले आहे हे वास्तव आहे.) प्रतिक्रांतीच्या काळात हिंदूंनी केलेल्या बौद्धांच्या कत्तली तर सर्वज्ञात आहेत. 

 

मुद्दा: 

 नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे अजूनही चिरंतन आहेत.

 हे शाश्वत सत्य आहे...

यालाच म्हणतात सनातन...🚩🕉🙏🏻

।। जय श्रीराम ।।

।। जय हिंदुराष्ट्र ।।


उत्तर: 

नद्या, पर्वत, समुद्र यांची नावे चिरंतन आहेत पण याचा उर्दू भाषेशी काय संबंध. अशा प्रकारची फालतू पोस्ट टाकून त्याला सनातन नाव देणे आणि उर्दूला हिणवणे यातून सनातन हा प्रकार काय लायकीचा आहे हेच दिसून येते.  

सनातनी प्रवृत्तीने निर्मिलेल्या असल्या टाकावू पोस्टवर विश्वास ठेऊ नका. 

॥जय भारत॥ 

॥जय संविधान॥  

🇮🇳🇮🇳🇮🇳

- चला उत्तर देऊया टीम


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?