*1) अंत्यसंस्कारवरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?*

*Infections spread टाळण्यासाठी.*


*2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?*

*Infections spread टाळण्यासाठी.*


*3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?*

*(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)*

*कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.*

*त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.*

*या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.*


*काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.*

*त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.*

*इथे कारण उलटे असते*

*कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.*


*4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?*

*आलं का logic लक्षात.*


*5) शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे,*

*पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही.*


*6) हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?*

*आता western लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा.*


*7) घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?*

*Logic लक्षात घ्या.*


*8. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....?*

*उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो.*

*या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...?*


*9)*

*आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.*


*10*

*जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे.*

*असे का...?*

*इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही...!*

*आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे.*

*आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.*


*11*

*एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही?*

*कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप,रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. Nonveg खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.*


*12*

*उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे..?*

 भारतीय पद्धतींचा logical विचार करा.*

*त्या बरोबर आहेत .👍*


*_आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे._*


🙏 *घरातच रहा सुरक्षित रहा*🙏


या पोस्टला उत्तर

12 तंबाखु सारखा कैफि गुंगी आणणारा घातक पदार्थ मळून मळून वाटण्याची रीत सुद्धा याच संस्कृतीत आहे.


11 ऑक्टोप्स म्हणजे इकडले माकुल मासा, काळव, शिंपल्या मुळ्ये इ तसेच इथल्याच संस्कृतीत  लोकांमध्ये जे उपलब्ध आहे ते खाण्यास मज्जाव नाही. आदिवासी - उंदीर , लमाण - मेंढ्या इ.

10 याला मूर्ख पणा म्हणायचं अजून काय इथे दगडातल्या विचित्र आकृतीला सुद्धा श्रद्धा चिकटवली जाते व त्यावर शोषण होते.

 9 पुरणे ऐवजी जाळणे यात झाडांचा किती बळी दिला जातो. प्रदूषण होते.

8 आमचे तेवढेच खरे बाकी किस झाड की पत्ती असं च लेखकाला सुचवावेसे वाटते होळीची बीभत्स पणा पाण्याचा अपव्यय हा ठळक पणे दिसून येतोच आहे

7 सूचना वर्तन अजून कसलं लॉजिक 

6 एकीकडे हळद फसायची आणि लगेच दारू , डी जे यांच्या उन्मादात धिंगाणा घालायचा.

5  महान संस्कृती असूनही वैद्यकिय अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे आरोग्य विषयक बाबीमध्ये आपण खूपच मागे आहोत.    

4 होय, मयत जर हॉस्पिटल मध्ये झालं तरी काल सुसंगत न वागत सुतका सारखे  काल बाह्य गोष्टी सारख वागण्यात काय अर्थ



मुळात संस्कृतील्या या गोष्टी कालानुसार बदलल्या असत्या तर नक्कीच त्या उपयुक्त ठरल्या असत्या मात्र कालसुसंगता न राखल्याने त्या टाकाऊ गोष्टींचा उरबडवा अभिमान आहे असे सांगण्यातच लेखकाचा उद्देश दिसून येतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?