हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?


हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?


१) *लग्नात मांडव कशासाठी ???*

= मातेनं माझ्या मुलीचं मनही मांडवासारखं मोठं आहे, हे सांगण्यासाठी !!!

२) *विहिणबाईला आणि नवरदेवाला स्वागतास पायघड्या कशासाठी???*

= माझ्या मुलीला तुम्ही असचं अलगद सांभाळा, हे सांगण्यासाठी !!!

३) *नवरदेवाची कानपिळी वधुच्या भावानेचं पिळायची,हे कशासाठी???*

=माझ्या बहिणीला तुमच्या जीवनात नीट आणि चांगलं वागवा, हे सांगण्यासाठी !!!+++

४) *मुलीच्या मागं मामाचं उभा राहतो,हे कशासाठी???*

= मुलीला सांगण्यासाठी की मी तुझ्या आईच्या पाठीशी भक्कम उभा आहे, हे सांगण्यासाठी !!!

५) *लग्नात वधु-वरांनी एकमेकास घास द्यायचा,हे कशासाठी???*

= प्रेमाचं हे प्रतिक आहे। तुझ्या- माझ्यात काही अंतर राहिलेलं नाही, राहणार नाही व राहू नाही  हे सांगण्यासाठी !!!

६) *लग्नात सप्तपदी माहित आहे का कशासाठी???*

= तुमच्या सुख-दु:खात मी आता सोबत आहे. सात पावलं हि केवळ मर्यादा आहे, हे सांगण्यासाठी !!!+++

७) *लग्नात तांदळाची अक्षता उधळण कशासाठी???*

= तांदूळ ची अक्षता याच्या साठी की तांदूळ चे बीज लावताना आपण एक जागी लावतो ते थोडे मोठे झाले की मग त्याची लावणी वेगळ्या जागी करतो तसेच मुलींचे बालपण माहेरी असते त्या जिथे मोठ्या होतात तिथून त्यांना दुसऱ्या जागी जावे लागते तिथेच त्यांचा वंश वाढतो, याची आठवण रहावी म्हणून लग्नात तांदुळाच्या अक्षता टाकतात *पण हे शास्त्र बऱ्याच लोकांना माहीत नाही..+++*

🙏🙏


*!! श्री स्वामी समर्थ !!*


==================

1) मांडवापेक्षाही खुले आकाश मोठे असते. मग खुल्या आकाशात लग्न का नको. मुलीचे मन जास्त मोठे होऊ नये म्हणून मांडवातच लग्न केले जाते का? 

अनेक संकुचित मनाच्या मुलींची लग्ने मांडवात केल्याने त्यांची मने मोठी होतात का? प्रत्यक्षात तर तसे काहीच दिसत नाही. 

आणि महत्वाची गोष्ट मोठ्या मनाची अपेक्षा मुलीकडूनच  का?  म्हणजे सगळे सहन करायचे ते मुलीनेच. मुलांना सगळ्या बाबतीत सूट का दिली जाते? आपल्या बुरसटलेल्या विचारांच्या समर्थनासाठी कोणत्याही गोष्टींचा (पारंपरिक असो की आधुनिक) आधार घेतला जातो. त्यातलाच हा एक प्रकार आहे.

2) ही गोष्ट सुद्धा पुरुषप्रधान मानसिकतेचे प्रतीक आहे. वराकडील लोकांना मोठेपणा आणि वधूकडील लोकांना उणेपणा देण्याचा हा प्रकार आहे. वधूचे घरात आगमन होत असताना तिच्यासाठी पायघड्या का नाहीत?

३) कानपिळी करताना वधूच्या भावाला हे सांगितले जाते का? आणि प्रत्यक्षात त्याच्या बहिणीला नीट वागवले जात नसताना त्याला पुन्हा कान पिळण्याचा अधिकार परंपरेत आहे का? तो अधिकार परंपरेने दिला नाही परंतु संविधानाने दिला आहे, याचा विसर सोयीस्करपणे पडतोय.

4) लग्नात मुलाच्या मागेही त्याचा मामा उभा असतो. तो कशासाठी? केवळ मामाच कशासाठी हवा? बाकीचे नातेवाईक का नको? मामानेच आपल्या आईच्या पाठीशी उभे राहावे आणि वडील, भाऊ यांनी आईला वाऱ्यावर सोडावे असा यातून संदेश द्यायचा आहे का?

5) ही एक रोमँटिक गोष्ट आहे. यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. पण काही ठिकाणी याची जबरदस्ती केली जाते. अतिरेक केला जातो. या जबरदस्तीच्या प्रेमावर पोस्टमध्ये एक अक्षरही लिहिले नाही.

6) सप्तपदीचा हा अर्थ किती जोडप्यांना माहीत आहे? आणि सोबत चालणे आणि फरफट यामध्येही फरक आहे. स्वभाव किंवा इतर कारणांनी एकाची दुसऱ्यासोबत फरफट होत असेल तर परंपरेत काय तरतूद आहे?

7) याच पद्धतीने कांद्याची लागवडही केली जाते. वांगी, मिरची, इ. पिकांची लागवडही याच पद्धतीने केली जाते. मग त्यांच्या बिया अक्षदा म्हणून का वापरत नाही? केवळ तांदळाच्या वंशाचीच आठवण राहावी असे वाटते का? दुसरी गोष्ट सगळीकडेच अक्षदा म्हणून तांदूळ वापरले जात नाहीत. बऱ्याच ठिकाणी ज्वारी, गहू वापरले जातात. त्यांची लागवड तर बी पेरून होते.  मग इथे कुठल्या वंशाची आठवण राहते?

एकंदरीत सदर पोस्टला कोणताही आधार नाही. केवळ हवेत गोळ्या मारण्याचे काम केलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?